म्हणुन आनंदी रहा..

कुणाच्या सांगण्यावरुन आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले वा वाईट मत बनवण्यापेक्षा, आपण स्वतः चार पावले चालुन समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधुन मगच खात्री करा.
नाती जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे ...

 बोलताना शब्दांची उंची वाढवा
आवाजाची उंची नाही.

कारण..  पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते,
 विजांच्या कडकडाटामुळे नाही..

वाहतो तो झरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं..
डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर  राजहंस!!

 निवड आपली आहे.."
 
कुणा वाचून कुणाचे काहीच आडत नाही हे जरी खरे असले तरी,
कोण कधी उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.

डोक शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत,
अन्...
भाषा गोड



जपून टाक पाउल ... इथे प्रत्येक वाट आपली नसते
जपून ठेव विश्वास ... इथे प्रत्येक माणुस आपला नसतो
जपून घे निर्णय ... इथे प्रत्येक पर्याय आपला नसतो

जे भांडल्यावर आधी क्षमा मागतात,
त्यांची चुक असते म्हणून नव्हे,
तर त्यांना आपल्या माणसांची पर्वा असते म्हणून...

जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात,
 ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नव्हे,
तर ते तुम्हाला आपलं मानतात म्हणुन..!
   
मोर नाचताना सुद्धा रडतो...
 आणि...
राजहंस मरताना सुद्धा गातो...

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...
आणि
सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून
कारण या जगात उद्या काय होईल ते कोणालाच माहित नसते...

म्हणुन आनंदी रहा..

आयुष्यात कोणत्याही कामाला लहान समजू नका...

 कारण...

कोणी लोखंडाचं काम करून  ' टाटा ' बनला !!
  कोणी चपलांचं काम करून  ' बाटा ' बनला !!
कोणी टेलिफोन पुसता पुसता   ' DSK ' बिल्डर बनला !!
  कोणी गाड्या पुसता पुसता   'अंबानी ' बनला !!
 
तर कोणी चहा विकता विकता  ' PM ' बनला...!!!

No comments: